‘माझं आंगण रणांगण’,भाजपचा नारा

कोरोना विरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे. आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून शुक्रवार, २२ मे रोजी राज्यभर पक्षाचे लाखो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सरकारच्या कामाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्या घराबाहेर फलक घेऊन निदर्शने करतील, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

First Published on: May 20, 2020 5:13 PM
Exit mobile version