महाराष्ट्रावर बोललं का ‘सरकार’ उघड पडतं; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

विधीमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशन सुरु व्हायच्या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारचा समाचार घेतला. ‘मुख्यमंत्री रशिया, अमेरिकेत काय झाले ते बोलतात. महाराष्ट्रात काय दिवे लावलात ते बोला’, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. सरकारकडे बंगल्यांवर खर्च करायला पैसा आहे, मग शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.

First Published on: December 14, 2020 3:26 PM
Exit mobile version