भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना आपले मंत्रीपद सोडवे लागले होते. त्यानंतर दोन वेळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र खडसेंना त्यात स्थान देण्यात आले नाही. ही खंत खडसे यांनी शेवटच्या अधिवेशनात बोलून दाखवली. माझ्यावरचा भ्रष्टाचाराचा डाग धुवून टाका, असे आर्जव त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले. पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर सोयीस्कर मौन बाळगले.