कर्नाटक निवडणुकीच्या निकालावरून मनसे आणि भाजपाचं बिनसलं?

‘आपलं कोण वाकडं करू शकतो, अशा विचारात जो असतो त्याचा पराभव झालाय…’ अशी प्रतिक्रिया कर्नाटकात भाजपच्या झालेल्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली. ‘आमच्या पराभवाचे विश्लेषण करण्याची गरज नाहीये,’ असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आणि यानंतर भाजपा नेते व राज ठाकरेंमध्ये सुरू झाली शाब्दिक चकमक. महाराष्ट्रात मनसे आणि भाजपाची जवळीक वाढत असताना अचानक झालेल्या या शाब्दिक वादामुळे राजकीय समीकरणे घडणार की बिघडणार, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. नेमकं प्रकरणं काय? कर्नाटकच्या निकालावरून मनसे भाजपात का जुंपलीय? जाणून घेऊयात…

First Published on: May 15, 2023 5:50 PM
Exit mobile version