सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की, मी आणि माझ्या मंत्र्यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी अर्ज दिल्याचं सांगितलं. आता उद्धव ठाकरे यांनी सांगावं की, ते पत्र त्यांनी स्वतः लिहिलं की ठाकरे सरकारद्वारे लिहिलं, असा सवाल ठाकरे सरकारला केला आहे.

First Published on: March 5, 2021 2:18 PM
Exit mobile version