मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प बोगस असल्याची अतुल भातखळकरांची टीका

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरुन शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आणि केवळ बोगस बजेट आहे. गेल्या वर्षभरात भांडवली खर्च ४० टक्के सुद्धा ते करु शकले नाहीत. मराठी शाळा विकण्याचा घाट आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करणार या नावाखाली घातला गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना जो मध्यमवर्गीय आहेत. कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे त्यांच्या तोंडाला पानं पुसणारा आणि कंत्राटदारांना मदत करणारा भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे म्हणत अतुल भातखळकर यांनी निषेध केला आहे.

First Published on: February 3, 2022 1:54 PM
Exit mobile version