नवं सरकार या राज्याला पूर्ववैभव प्राप्त करुन देईल असा विश्वास आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा काम आम्ही मिळून करणार आहोत. भाजपने सत्तेचा गैरवापर केला. त्यात सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला. राज्यपालांनाही दबावाखाली आणण्याचं काम भाजपने केलं. महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम भाजपने केलं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी दिली आहे.