वन्यजीव संरक्षणासाठी कर्नाळा खिंडीत साखळी आंदोलन

रायगड जिल्ह्यातील एकमेव मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्षी, प्राणी सुरक्षित नसल्याची बाब वारंवार समोर येत असून, लाख रुपये खर्च करून महामार्गावर प्राणी येणार नाहीत त्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तांत्रिकदृष्ट्या फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वन्य जीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी रविवारी कर्नाळा खिंडीत मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.

First Published on: September 6, 2021 10:00 PM
Exit mobile version