चौकशी शिवाय बोलणे योग्य नाही

विरारमधील विजय वल्लभ या खाजगी रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अशा घटना वारंवार घडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच या घटनेची चौकशी करावी. त्यामुळे चौकशीशिवाय एखाद्या घटनेवर बोलणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

First Published on: April 23, 2021 4:51 PM
Exit mobile version