नाशिकमध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील बाजारपेठांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले. येथील दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. या पुरजन्य परिस्थितीची जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करत व्यापार्यांशी चर्चा केली. तुंबणार्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात या भागाचा सामावेश केला जाईल, असे आश्वासन भुजबळ यांनी व्यावसायिकांना दिले.