आमदारांना चिंता होती, पुढे कसं होणार, चिन्ह कोणते मिळणार पण त्यांना सांगितले आपण शिवसैनिक आहोत. सगळं टेंशन सोडा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच बंडखोर आमदारांपैकी काही निवडून येणार नाही असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले ५० पैकी एकही पडून देणार नाही तर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मी २०० उमेदवार निवडून आणू असे एकनाथ शिंदे म्हणाले.