“सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी देखील तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील अनेक मंदिर बंद करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र, देऊळ बंद असल्यामुळे आता याचा व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, आता अनेक ठिकाणचे निर्बंध उठवले जात आहेत. त्यामुळे आता मंदिरांचे दरवाजे देखील उघडावेत”, अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.