हा भारताच्या लोकशाहीचा विजय – छगन भुजबळ

दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेकदा आरोप होऊनही त्यांनी सातत्याने काम केलं. आता लोकांना फसवता येणार नाही. दिल्लीत भाजपला लोकांनी नाकारलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अनेक राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री खासदारांच्या रांगा भाजपने लावल्या होत्या. मात्र जनता अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभी राहिली. भाजपने हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. शाहीन बाग मुद्यांवर मत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, जनतेने विकास कामांच्या मुद्यांवर मतदान केलं अशी प्रतिक्रिया अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

First Published on: February 11, 2020 5:33 PM
Exit mobile version