राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत स्थापन झालं आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुका महाविकासआघाडी एकत्रच लढणार असं मानलं जात होतं. मात्र, मुंबई महानगर पालिकेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीबाबत अद्याप या तिन्ही पक्षांमध्ये काहीही ठरलं नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.