शेतकऱ्यांना चोर म्हटल्याने प्रवीण दरेकर आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी

विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज तोडणीमुळे खडाजंगी झाली आहे. विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांना आलेल्या अवाजवी बिलाचा मुद्दा काढला होता. यावर सत्ताधाऱ्यांकडून उत्तर देताना टाळाटाळ करण्यात आली. तसेच एका सदस्याने शेतकऱ्यांना चोर म्हटल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चिडले होते. विरोधीपक्षनेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला होता. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला आहे.

First Published on: December 23, 2021 2:25 PM
Exit mobile version