आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांच्या जीवनातील अनमोल भक्ती भावाचा दिवस असतो. मात्र यावर्षी या दिवसांवर कोरोनाचं सावट आलं आहे. परंतु परंपरेने आषाढी एकादशीचा उपवास सर्व वारकरी बांधव तसेच हिंदू जनमानसात भक्ती भावे केला जातो. त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी मुंबईतील सर्व वारकरी बांधवांना उपवासाच्या खिचडीचे वाटप महापालिकेने करावे, अशी विनंती राजेश शिरवडकर यांनी महापालिकेला केली आहे.