केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर भाजपवर टिकेची झोड उठली असतानाच, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. निर्णय मागे घेण्याचा मनाचा मोठेपणा पंतप्रधानांनी दाखवलाय. अशा प्रकारचा मनाचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.