विधीमंडळ बैठकीवर विरोधी पक्षाचा बहिष्कार

“कोरोनाचा बहाणा पुढे करुन राज्य सरकारने दोन दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे. इतर वेळी सरकारी कार्यालयांचे उद्घाटन होऊ शकते. दुसरीकडे राज्यातल्या बारमध्ये कितीही लोक गेले तरी चालू शकत. पण, राज्याच्या विधीमंडळामध्ये मात्र कोरोनाच्या भितीमुळे अधिवेशन घ्यायचे नाही, अशा प्रकारे सरकारची मानसिकता आहे. केवळ दोन दिवसांचे अधिवेशन सरकारने प्रस्थापित केले. सरकारच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करुन बाहेर पडलो”,अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

First Published on: June 22, 2021 3:06 PM
Exit mobile version