Maratha Reservation: राज्य सरकारकडून नौटंकी सुरू

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे. सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार? अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकतं यासंदर्भात विचार करायला हवा. ५० टक्क्यांवरचं आरक्षण राज्याने दिलं होतं. त्यामुळे याविरोधात केंद्र सरकार कशी पुनर्विचार याचिका करेल? असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला.

First Published on: May 14, 2021 7:37 PM
Exit mobile version