१०० कोटी हिंदू सहिष्णू आहेत म्हणूनच तुम्ही बोलू शकता

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी काही दिवसांपूर्वी ‘१०० कोटी हिंदूवर १५ कोटी मुस्लिम भारी पडतील’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा आज देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. “१०० कोटी हिंदू समाज सहिष्णू असल्यामुळेच तुम्ही या देशात बोलू शकता. आमच्या सहिष्णूतेला दुर्बलता समजण्याचे पाप कुणी करणार असेल तर त्यांची औकात दाखविण्याचे काम आम्हाला करावे लागेल”, असे फडणवीस म्हणाले.

First Published on: February 23, 2020 7:00 PM
Exit mobile version