कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेत चर्चेत आला. कर्नाटकच्या मंत्र्यांनी आता ‘मुंबई केंद्रशासीत प्रदेश करावा’, असं वक्तव्य केल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. दरम्यान या वक्तव्याचा निषेध करत देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई कोणाच्या बापाची नाही’ असा पुनरुच्चार केला