आमच्या व्यथा कोण मांडणार?

‘कोरोनाची पहिली लाट आम्ही यशस्वीपणे थोपविण्यासाठी सहकार्य केले. ज्यावेळी गरज होती त्यावेळी मदत करण्यात आली आहे. यावरुन ‘गरज सरो वैद्य मरो’ असे महाराष्ट्र शासनाचे धोरण असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता आमच्या व्यथा कोण मांडणार? अशी भावनिक साद घालत राज्यातील बी.ए.एम.एस.डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितू पाटील यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांना खुले पत्र लिहिले होते. आता त्यांच्या या मागणीला केंद्राचीही साथ मिळाल्याने लवकरच काही निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे’,अशी प्रतिक्रिया उत्तर महाराष्ट्र भाजप डॉक्टर संघटनेचे सहसंयोजक डॉ. नितू पाटील यांनी दिली आहे.

First Published on: May 18, 2021 2:08 PM
Exit mobile version