नव्या कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारतबंदला पाठिंबा देण्यासाठी आज ठाण्यात ईस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ भारतीय जयहिंद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत हा हायवे रोखून धरला. यावेळी शेतकरी जिंदाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांपैकी भाई जाधव यांनी पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले.