विजेचं बिल सर्वांसाठी धोकादायक – संजय राऊत

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इलेक्ट्रीसिटी विधेयकला विरोध दर्शवल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा विजेचं बिल धोकादायक असल्याचे म्हंटल आहे. जे विधेयक सरकार आणत आहेत त्याच्यावर आमच्या पक्षात देखील चर्चा झाली. त्याच्यावर राज्यांशी चर्चा झालेली नाही . कोणाशीही चर्चा न करता जर अशा प्रकारची विधेयक सरकार मंजूर करत असेल तर यावर सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा करणे गरजेचे आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

First Published on: August 8, 2021 3:41 PM
Exit mobile version