११वी प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता

मराठा आरक्षणला स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. हा तिढा तात्काळ सुटावा याकरता विद्यार्थ्यांसह पालकांनी तसेच कोचिंग क्लासेस असोसिएशनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान येत्या दोन दिवसात अकरावी प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

First Published on: November 2, 2020 6:32 PM
Exit mobile version