देवेंद्र फडणवीसांनी दिलं सरकारला आव्हान!

शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर आज विधानसभेत विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडलं. या मुद्द्यांवर राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी आम्ही सभागृह बंद पाडलंय, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. त्यासोबतच, सरकारने फक्त चौकशांची चर्चा करून माध्यमांना बातम्या पुरवू नये, चौकशी पूर्ण करावी, असं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं.

First Published on: February 25, 2020 3:31 PM
Exit mobile version