हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन गदारोळ घातला. सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा या विषयाला घेऊन विरोधक आक्रमक होत आहेत. पण, आता बोटं मोडत बसण्याशिवाय विरोधकांकडे पर्याय नाही असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.