जालना जिल्ह्यातील शेतकरी लागला शेती मशागतीच्या कामाला

एकीकडे कोरोना महामारीमुळे सर्व जग ठप्प झाले आहे. तर दुसरीकडे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आपल्या शेती मशागतीच्या कामात मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यावर कधी पावसाचे संकट तर कधी कोरोना महामारीचे संकट यामध्ये शेतकरी पुरता भरडला जात आहे. कारण शेतकऱ्यांना पाहिजे तो मार्केट भाव सध्या कोणत्याच मालाला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे.

First Published on: May 10, 2021 9:29 PM
Exit mobile version