काँग्रेस पक्षाने मुंबईत लावलेल्या पोस्टरबाजीवरून भाजपा महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी फटकारले केले. ‘भारत दोन व्हायरसशी झुंज देत आहे. कोरोना आणि काँग्रेस. कोरोना महामारीशी संपूर्ण जग लढत आहे. अशामध्ये सर्व देश एकमेकांची मदत करीत आहेत. जेव्हा भारताला आवश्यकता पडली तेव्हा ऑक्सिजन असो, व्हेंटिलेटर असो, रेमडेसिविर इंजेक्शन असो, इतकंच काय तर व्हॅक्सीन सुद्धा इतर देशांनी भारताला मदत म्हणून दिले. मात्र, आता भारताने विदेशात लसी दिल्यानंतर मुंबईत पोस्टरबाजी करण्यात येत आहे. अशाप्रकारची पोस्टरबाजी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा’, अशी मागणी भाजपा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय पांडे यांनी दिली आहे.