पोहण्याच्या मोहाने आतापर्यंत घेतले पाच बळी

ठाण्यातील येऊरच्या धबधब्यावर जिल्हाधिकार्‍यांचे निर्बंधाचे आदेश आहेत. तरीदेखील येऊरमधील नील तलावात गेल्या २४ तासात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी मद्यपार्ट्या करणे, दारूच्या बाटल्या फोडणे आणि मोठ्या आवाजात संगीत लावून  धिंगाना घालने यासारखे प्रकार चालू असतात. आशा गोष्टीमुळे येऊर मधील पर्यावरणाला याचा धोका झाला आहे. या गोष्टीवर आळा घालण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

First Published on: June 22, 2021 5:09 PM
Exit mobile version