राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरही त्याचा ताण आलेला दिसून येत आहे. “बऱ्याच रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केला जात असून देखील रुग्णांना इंजेक्शन मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर राज्य सरकार देखील वसूलीच्या भूमिकेत”, असल्याची टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.