‘धार्मिक वाद निर्माण करण्याचा सरकारचा इरादा’

नागरिकत्व दुरस्ती विधेयक आणून हे सरकार देशात मुस्लिम विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरस्ती विधेयकाचा प्रस्ताव लोकसभेत मांडल्यानंतर आता या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होत असताना प्रकाश आंबेडकर यांनी देखील यात उडी घेतली आहे. मुस्लिम ज्याचा धर्म आहे त्याला तुझे नागरिकत्व सिद्ध कर असे सांगणारा हा कायदा असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेचा हा घटनेचा द्रोह असून, इतर मुद्दे बाजूला पडावे म्हणून हिंदू-मुस्लिम वातावरण तयार करण्याची ही भाजप आणि आरएसएसची खेळी असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली.

First Published on: December 9, 2019 6:48 PM
Exit mobile version