आघाडी सरकारच्या चुका दुरुस्ती लायक नाहीत – हरीभाऊ राठोड

ओबीसी आरक्षणासाठी गोळा करण्यात आलेल्या डेटामध्ये अनेक चुका आहेत. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी आघाडी सरकारकडून झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यात येइल आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ व विजय वड्डेटेवार यांच्याबरोबर चर्चा करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावर हरीभाऊ राठोड यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर टीका केली आहे. मविआच्या काळात ओबीसीचा डाटा मिळवण्यासाठी आडनावावरून केलेला सर्वेक्षण संपूर्णतः रद्द केले पाहिजे , आणि नव्याने घरोघरी जाऊन ओबीसीचे सर्वेक्षण केले पाहिजे असे हरीभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे

First Published on: July 7, 2022 9:39 PM
Exit mobile version