चौपदरी रस्त्यातील त्रुटी होणार दूर

सातारा के कागल राष्ट्रीय महामार्ग सहापदरी झाल्यानंतर रस्ते सुरक्षा वाढेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. चौपदरीकरण कामात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. याबद्दल कागलमधील नागरिकांनी कृती समिती स्थापन करत तीव्र आंदोलनही केले होते. ही कामे अनेक वर्षे प्रलंबित आहेत. अशीच अवस्था अन्य ठिकाणीही असल्याने आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

First Published on: May 31, 2021 8:56 PM
Exit mobile version