गेल्या चार महिन्यांपासून असह्य उकाड्याचा सामना करावा लागत असलेल्या जळगावकरांना अखेर पावसामुळे दिलासा मिळाला आहे. शहरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जळगावकर सुखावले आहेत. गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. परंतु, यंदा हवामान खात्याकडून चांगला मान्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, तरी देखील अर्धा जून संपल्या तरी पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे शेतकरी धास्तावले होते. परंतु, पावसाने जळगावमध्ये हजेरी लावल्यामुळे जळगावकर सुखावले आहेत.