मुंबईत मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. दादर, हिंदमातासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे त्याचा वाहतूकीवर देखील परिणाम झाला आहे. यामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. यंदा हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही, असा विश्वास महापालिकेने दिला असताना देखील पहिल्याच पावसाच दीड फुटापर्यंत पाणी साचले आहे.