मुंबईत मंगळवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या उपनगरात पावसाच्या सरी बरसल्याने संपूर्ण रस्ते ओले चिंब झाले आहेत. तर कांदिवली, बोरिवली भागात पाऊस बरसल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झालेले पाहायला मिळाले. मात्र, पावासाने लावलेल्या हजेरीमुळे मुंबईकर सुखावला आहे.