गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली तसेच स्पर्धेमुळे ताणतणाव वाढले आहेत. अगदी केजीमध्ये शिकणाऱ्या लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत, चार भिंतीत वावरणाऱ्या गृहिणीपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत तणावाची पाळेमुळे खोल रुतल्याने दिवसागणिक मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं जावं हे समजून घेण्यासाठी ‘ माय महानगर’ने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांच्याशी संवाद साधला.