इगतपुरी तालुक्यातील विविध भागांत सलग चौथ्या दिवशीही विजेच्या कडकडाटासह गारपीट आणि वादळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक हेक्टर जमिनीवरील पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. आधी शेतकरी कोरोनाने हवालदिल झाला असताना आता शेतकऱ्यांना पावसाच्या नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.