‘स्मशानावरचा वाढलेला ताण कमी करणे गरजेचे’

कोविड काळात अमरावतीच्या मध्यवस्तीत वसलेल्या हिंदू स्मशानभूमीत येणारा अंत्यसंस्कारांचा ताण हा अधिक आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा असह्य त्रास कमी करावा या स्मशानावरचा वाढलेला ताण कमी करणे गरजेचे आहे. मात्र, अस असताना आता पुन्हा तिसरी गॅस किंवा विद्युत दाहिनी बसवण्याचा विचार केला जात आहे. मात्र, या ठिकाणी तिसरी दाहिनी न बसवता. शहरातील इतर कुठल्याही स्मशानात बसवावी, अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि परिसर बचाव कृती समितीचे प्रमुख शिवराय कुळकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

First Published on: May 25, 2021 4:07 PM
Exit mobile version