जो रूटला रोखण्याचे भारतापुढे आव्हान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचे या मालिकेत पारडे जड मानले जात आहे. मात्र, भारताला इंग्लंडच्या एका फलंदाजाला बाद करणे अवघड जाऊ शकेल. तो फलंदाज म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जो रूट. रूटने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २ सामन्यांत एक द्विशतक आणि एका शतकाच्या मदतीने ४२६ धावा केल्या. त्यामुळे त्याला रोखणे हे भारतीय गोलंदाजांपुढे मोठे आव्हान असणार आहे.

First Published on: January 28, 2021 5:24 PM
Exit mobile version