भारतासह जगभरात रोज मोठया प्रमाणात अर्धपोटी जगणारे लोक आहेत. मात्र, दुसरीकडे मोठया प्रमाणात अन्नपदार्थांची नासाडी होत आहे. भारतात लग्न समारंभ आणि घरगुती कार्यक्रमात अन्नाची मोठी नासाडी होते. अन्नपदार्थ वाया घालवण्यात जगात पहिल्या क्रमांकावर चीन आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भविष्यातही हे असंच सुरु राहिलं तर भारताच्या दृष्टीने ते अत्यंत धोकादायक आहे.