उच्च व तंत्र शिक्षण विभागाची महत्त्वाची माहिती

सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर तेथील कोविडची पारिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना महविद्यालयात आल्यावर कोविड होणार की नाही याची दखल घेऊन निर्णय घेतला जाईल. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. त्यानंतर महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय होईल. परंतु, सध्याच्या स्थितीमध्ये महाविद्यालय सुरु करण्याच्या मनस्थितीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग नाही, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना केले.

First Published on: July 10, 2021 8:07 PM
Exit mobile version