नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय हे दररोज पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीत स्नान करता. महत्वाचे म्हणजे, स्नान करताना ते साबण वापरत नाही की कुठले क्रीम. केवळ नदीच्या पाण्याचाच ते वापर करतात. यामागे केवळ धार्मिक कारण नाही तर प्रदूषणमुक्त नदीच्या चळवळीसाठी पोलीस आयुक्तांनी उचललेले पाऊल आहे. ज्या भागात नद्या आहेत तेथील रहिवासी जेव्हा नदीपात्रामध्ये जाऊन आंघोळ करतील तेव्हा खऱ्या अर्थाने नद्या स्वच्छ होतील असं पोलीस आयुक्तांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले. जागतिक नदी दिनानिमित्त ‘माय महानगर’ चा हा स्पेशल रिपोर्ट…