मंत्रिमंडळ विस्तारावरुन जयंत पाटलांचा टोला

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येऊन १५ दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुन विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. १५ दिवस झाल्यानंतर देखील त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. महाराष्ट्रामध्ये पूर आणि अतिवृष्टीचे संकट यायला लागले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी सरकार स्थापन करून योग्य त्या पद्धतीने काम सुरू करायला पाहिजे होतं. पण कोणत्या गोष्टीमध्ये हे सरकार अडकले आहे, ते नेमके समजत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

First Published on: July 15, 2022 2:09 PM
Exit mobile version