राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सीबीआय चौकशीनंतर आज शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जलसंपदा मंत्री यांनी प्रतिक्रिया देत “देशात न्याय करण्याच्या यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे कृत्य सुरु आहे”, अशी टीका जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केली आहे.