पूर स्थिती बाबत कर्नाटक सरकारशी सकारात्मक चर्चा..

पुर परिस्थितीशी सामना करण्यासाठी सांगलीवाडी येथील मराठा बोट क्लबच्यावतीने “जयंत रेस्क्यू फोर्स”ची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल,असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.संभाव्य पूराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारशी सकारात्मक चर्चा पार पडली आहे,अशी माहितीही मंत्री पाटील यांनी दिली आहे. सांगलीमध्ये सामाजिक संस्थेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या आपत्ती यंत्रणेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

First Published on: June 20, 2021 6:09 PM
Exit mobile version