विधान परिषदेत आज (4 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारचा बहुमत चाचणीत विजय झाला. यावेळी अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण मी गेले २० वर्षे पाहत आहे. त्यांची भाषण करण्याची पद्धत वेगळी आहे. पण ही पद्धत आज दिसली नाही. आज त्यांची स्टाईल, आवेश, आक्रमकपणा दिसला नाही. त्यांचा आवाज दबला गेला असं वाटलं. जसा मी बदललो तसे तुम्ही बदललात असं दिसतंय.