राज्यपालांवर अद्याप कारवाई नाही, आव्हाडांची प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली, राज्यपालांनी राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी दुसरीकडे होत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवरायांविषयी दिल्लीच्या मनामध्ये आकस आहे, राज्यपालांवर अद्यापही कारवाई करण्यात आली नाहीये,’ असं वक्तव्य त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलंय.

First Published on: November 29, 2022 9:08 PM
Exit mobile version