महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई सुरु होती. यातील काही नेते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आहेत. आता या नेत्यांवरील ईडी कारवाईचे काय होणार असा प्रश्न किरीट सोमय्या यांना विचारण्यात आला होता. यावर सोमय्यांनी स्पष्ट सांगितले आहे. सरकार बदललं तरीही माझ्या तक्रारी मी मागे घेणार नाही. असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.